घरमुंबईदेशात भयानक स्थिती; लढण्यासाठी सज्ज व्हा - शरद पवार

देशात भयानक स्थिती; लढण्यासाठी सज्ज व्हा – शरद पवार

Subscribe

शरद पवार यांनी आपल्या भाषणामध्ये आजच्या देशातील सद्दय परिस्थितीवर भाष्य करताना, याविरोधात जनतेने एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगितले.

”जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे आणि चुकीचे संदेश पोचवण्याचे काम केले जात असल्यामुळे देशात आज खराब आणि भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी या शक्तीच्याविरोधात सामना करण्यासाठी सज्ज व्हा. आपल्याला नेहरु, मौलाना आजाद आणि आंबेडकरांचे विचार घेवून आपण पुढे जायला हवे” असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केले. मौलाना अबुल कलाम आजाद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शरद पवार बोलत होते. त्यांनी आपल्या भाषणामध्ये आजच्या देशातील सद्दय परिस्थितीवर भाष्य करताना याविरोधात देशातील जनतेने एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमात बोलताना पवार म्हणाले, ‘आज देशात नवीन पध्दत सुरु झाली नावे बदलण्याची. आग्रा येथील ताजमहल जो हिंदूस्थानची इज्जत वाढवत आहे. काय गरज आहे त्याचे नाव बदलण्याची? त्यामुळे बेरोजगारी सुटणार आहे का? देशातील समस्यांकडे दुर्लक्ष करुन त्याकडील लक्ष विचलित करण्याचे काम केले जात आहे. देशासमोर बेरोजगारी,गरीबी अशा समस्या असताना नावं बदल करण्याची गरज नाही’, असंही पवार म्हणाले.

शरद पवार यांनी आपल्या भाषणामध्ये देशाचे शिक्षणमंत्री राहिलेले मौलाना आजाद यांच्या दुरदृष्टीच्या कार्यावर प्रकाशझोत टाकला. आजाद यांच्यामुळे कला,साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्रांमध्ये नॅशनल इन्स्टियूट उभी करण्याचे काम झाले आणि त्यामुळे आज आपण इथपर्यंत पोचल्याचेही ते म्हणाले. आपल्या भाषणामध्ये पवार यांनी, पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर आलेला अनुभव आणि त्याठिकाणी मौलाना आजाद यांच्याबद्दल असलेला आदर याचे किस्सेही सांगितले. याशिवाय खडकपूर येथील तज्ज्ञांनी लातूर भूकंपानंतर उभारलेली नवीन घरं आजही टिकली आहेत, ही देण आजाद यांचीच असल्याचेही पवार यांनी सांगितले.

- Advertisement -

सर्व जातीधर्माच्या लोकांनी एकत्र येण्याची आवश्यकता

संविधान बदलण्याची भाषा केली जाते…महान व्यक्तींनी जो पाया घातला तो पाया हलवण्याचा प्रयत्न होतो आहे. सिस्टिम तोडली जात आहे. याकडे गांर्भीयाने पाहण्याची गरज असून त्यासाठी सर्व जातीधर्माच्या लोकांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी व्यक्त केले. मौलाना आजाद यांनी शिक्षणात असे काम केले की ७० वर्षात ते कमी झालेले नाही. त्यांच्या शिक्षणातील योगदानाने क्रांती घडल्याचे सांगतानाच आजाद यांनी शिक्षणात एकच व्यवस्था हवी याचा आग्रह धरला होता. शिवाय त्यांनी सायन्सला प्राधान्य देत आयआयटीची निर्मिती केली. त्यांनी या गोष्टींना प्राधान्य दिले नसते तर आज वाईट अवस्था होती असे मतही जयंतराव पाटील यांनी व्यक्त केले.

आजाद यांच्या दुरदृष्टीमुळे शिक्षणात प्रगती घडली आहे त्यामुळे देशातील जनतेने त्यांच्याबद्दल आदर राखला पाहिजे असेही ते म्हणाले. महाराष्ट्र राज्य पहिले राज्य आहे ज्याने बजेटमध्ये सच्चर समितीसाठी निधीची तरतुद केली आहे असेही जयंतराव पाटील यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमामध्ये शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. 


वाचा: यापुढे निवडणूक नाही – शरद पवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -