घरमुंबईगोरेगाव ते बोरीवली शुक्रवारी पाणी कपात

गोरेगाव ते बोरीवली शुक्रवारी पाणी कपात

Subscribe

जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने गोरेगाव ते बोरीवलीत शुक्रवारी पाणी कपात करण्यात आले आहे.

मालाड जलाशयाला जोडणार्‍या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम गुरुवारी २५ जुलै रोजी मध्यरात्री होती घेण्यात येणार असून हे काम शुक्रवारी २६ जुलै रात्रीपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे गोरेगाव ते बोरीवली भागात पाणीकपात केली जाणार आहे. या कालावधीत पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महापालिका जलअभियंता विभागाने दिली आहे.

जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम

मालाड जलाशयाला जोडणार्‍या २४००मि.मी व्यासाची मुख्य जलवाहिनी तसेच १५०० मि.मी व्यासाच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम गुरुवारी मध्यरात्री हाती घेण्यात येणार आहे. या दुरुस्तीच्या काळात गोरेगाव पूर्व आणि पश्चिम भाग, मालाड पूर्व आणि पश्चिम भाग, कांदिवली पूर्व आणि पश्चिम भाग तसेच बोरीवली पश्चिम भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा. तसेच पाण्याचा साठा करून ठेवावा, असे आवाहन जलअभियंता तथा उपायुक्त अशोककुमार तवाडिया यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -