घरमुंबईवाझे प्रकरणात शरद पवारांची मध्यस्थी नाही, गृहमंत्री योग्य पावलं उचलतायत - जयंत...

वाझे प्रकरणात शरद पवारांची मध्यस्थी नाही, गृहमंत्री योग्य पावलं उचलतायत – जयंत पाटील

Subscribe

कुणालाही पाठीशी घालण्याची सरकारची भूमिका नाही - जलसंपदा मंत्री जयंत पाटील

राज्यात प्रख्यात उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराजवळ स्फोटकांसह गाडी सापडली. या प्रकरणाचा तपास एनआयएकडे गेला आहे. एनआयए त्यांच्याकडील माहितीच्या आधारे तपास करत आहे. या तपासांतर्गत एनआयएने सचिन वाझे यांना अटक केली आहे. तसेच सचिन वाझे यांना पोलीस खात्यातूनही दुसऱ्यांदा निलंबित करण्यात आले आहे. तपास यंत्रणा प्रकरणाची चौकशी करत आहे. हा तपास सुरु असताना कोणत्याही मंत्र्यांने बोलणे चुकीचे आहे. तपासात जो कोणी दोषी आढळेल त्यांच्यावर योग्य कारवा करण्यात येईल. असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

या प्रकरणात जे कोणी अधिकारी दोषी आढळतील त्यांना महाराष्ट्र सरकरा पुर्णपणे प्रायश्चित्त दिल्याशिवाय राहणार नाही असा आमचा विश्वास आहे. असेही वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.

- Advertisement -

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणातही अशाच प्रकारे उलट सुलट चर्चा झाली. त्या प्रकरणातही पोलिसांनी योग्य कारवाई केली होती. पालघर साधू हत्याकांड प्रकरणातही पोलिसांनी योग्य कारवाई करत दोषींवर कारवाई केली होती. तसेच सचिन वाझे प्रकरणातही योग्य कारवाई होईल. सरकार कोणाला पाठीशी घालणार नाही. इतर प्रकरणातही सरकारने कोणाला पाठीशी घातले नव्हते आणि आताही पाठीशी घालणार नाही असेही जयंत पाटलांनी म्हटले आहे.

शरद पवारांच राज्य सरकारच्या आदेशांमध्ये हस्तक्षेप असल्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कोणत्याही निर्णयात किंवा प्रकरणात मध्यस्थी करत नाहीत. पक्ष म्हणून आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून कोणी जर सल्ला मागितला तर ते देत असतात या अर्थ त्यांचा या सरकारमध्ये हस्तक्षेप आहे असे म्हणण्यात काही तथ्य नाही. परंतु वाझे प्रकरणात शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा केली हे माहीती नसल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे. तसेच या प्रकरणात मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील.

- Advertisement -

राज्यात एखादी मोठी घटना झाली की सगळ्यांच्या नजरा गृहखात्याकडे जातात आणि त्या नंतर निष्कर्ष काढले जातात. परंतु या घटनेत गृहमंत्री योग्य पावले उचलत आहेत. तपास एटीएसकडे आहे. एनआयएने तपास सुरु केला आहे ते योग्य तपास करतील जे कोणी या घटनेत सामील आहेत त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल. गृहमंत्रालय योग्य पावले उचलत आहेत. असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -