घरमुंबई...तर सरकार पाच काय पंधरा वर्षेदेखील टिकेल

…तर सरकार पाच काय पंधरा वर्षेदेखील टिकेल

Subscribe

राज्यातील सत्तास्थापनेच्या संदर्भातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची नवी दिल्लीमधील बैठक संपल्यानंतर या तिढ्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकार संपूर्ण पाच वर्षे टिकावे यासाठीच एवढी चर्चा सुरू आहे. जे ठरेल ते पूर्ण विश्वासाने आणि भक्कम पायावर उभे राहिले, तर सरकार पाच काय पंधरा वर्षे देखील टिकेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.

सरकारस्थापनेबाबत चर्चा बरीच पुढे गेलेली आहे. आमच्या मित्र पक्षांना उद्या आम्ही मुंबईत बोलावत आहोत. त्यांच्याशी उद्या १२ वाजता आम्ही भेटणार आहोत. त्यानंतरच पुढची आवश्यक पावले तातडीने पडतील असे पाटील यावेळी म्हणाले. मित्र पक्षांना विश्वासात घेतल्यानंतरच आम्ही ज्यांच्याबरोबर सरकार स्थापनेसाठी चर्चा करतो आहोत, त्यांच्याबरोबर पुढे जाणार आहोत. सरकार पाच वर्षे टिकावे यासाठीच एवढी चर्चा सुरू आहे,असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले. काँग्रेस-राष्ट्रवादीला सरकार चालवण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे व शिवसेना हा नवा पक्ष आमच्याबरोबर जोडला जातो आहे. त्यामुळे समन्वयाची आवश्यकता आहे,असेही पाटील म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -