घरमुंबईचारित्र्यावर संशयावरून पत्नीवर केले १५ वेळा चाकूने वार

चारित्र्यावर संशयावरून पत्नीवर केले १५ वेळा चाकूने वार

Subscribe

पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याच्या कारणावरून तिची निघृण हत्या करण्यात आली आहे. आरोपी पतीने १५ वेळा तिच्यावर चाकूने वार केले. भाईंदर पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे.

पती पत्नीच्या वादामधून उडणाऱ्या भडक्यामुळे एका पत्नीला आपला जीव गमवावा लागला आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय करून आरोपी पतीने तिची निघृण हत्या केल्याचा प्रकार भाईंदर येथे घडला आहे. पत्नीची हत्या करून पतीने पोलिसांकडे समर्पण केले. या प्रकरणी पोलिसांनी खूनाचा गुन्हा नोंदवला आहे. कुमार (४२) असे या आरोपी पतीचे नाव आहे. कुमार भाईंदर येथेच आपली पत्नी वीणा (३५) बरोबर राहत होता. वीणा हिचे भाईंदर परिसरातच ऑफिस आहे. कुमार हा वीणाच्या चारित्र्यावर संशय करत होता. या कारणावरून अनेकदा या दोघांमध्ये वाद झाले होते. २ जानेवारी रोजी वीणाने पतीचे घर सोडले होते. यानंतर कुमारने भाईंदर पोलिसांकडे पत्नी हरवल्याची तक्रार नोंदवली होती.

कसा घडला प्रकार

वीणाने घर सोडल्यानंतर ती कुमारचा फोन उचलत नव्हती. अखेर कुमार वीणाला भेटण्यासाठी तिच्या ऑफिसमध्ये गेला. तिथे त्याला वीणा भेटली. आपल्याला काही बोलायचे आहे, असे सांगून त्याने वीणाला एकट्यात बोलावले. थोड्या वेळात त्यांच्यात वाद सुरु झाले. रागाचा भडका उडून कुमारने वीणावर चाकूने हल्ला केला. कुमारने १५ वेळा हल्ला केला. दरम्यान या ठिकाणी उपस्थित नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यांनी विणाला रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच वीणाचे निधन झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान कुमारने भाईंदर पोलीस ठाण्यात जाऊन समर्पण केले. पोलिसांनी खूनाचा गुन्हा नोंदवला असून चाकू हस्तगत केला आहे. कुमारला ठाणे न्यायालयासमोर उभे करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -