घरमुंबईठाण्यातील दोन बेपत्ता मुलांचे आढळले  मृतदेह

ठाण्यातील दोन बेपत्ता मुलांचे आढळले  मृतदेह

Subscribe

ठाण्यातील दोन बेपत्ता झालेल्या १५ वर्षीय मुलांचे मृतदेह आढळून आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ठाण्यातील दोन बेपत्ता झालेल्या १५ वर्षीय मुलांचे मृतदेह कोपरी येथील मिठागर परिसरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शुभम देवकर आणि प्रवीण सत्यम अशी दोघांची नावे आहेत. कोपरीतील सुभाषनगर परिसरात हे दोघेही राहत होते. शनिवारी बेपत्ता झाल्याने त्यांच्या घरच्यांनी शोधाशोध करण्यास सुरूवात केली. मात्र, त्यांचा कुठेच शोध लागला नाही. अखेर शनिवारी त्यांच्या पालकांनी कोपरी पोलीस ठाण्यात दोघेही बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती आणि आज त्या दोन बेपत्ता मुलांचे मृतदेह आढळून आले आहे.

नेमके काय घडले?

ठाण्यामध्ये राहणारे शुभम देवकर आणि प्रवीण सत्यम ही दोन मुले शनिवारपासून बेपत्ता झाली होती. या मुलांच्या घरच्यांनी नातेवाई आणि मित्रांकडे त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांचा शनिवार रात्री पर्यंत शोध लागला नाही. मात्र, रविवारी दुपारच्या सुमारास कोपरीतील के सी इंजिनिअरींग कॉलेजजवळील मिठागर येथे दोघांचेही मृतदेह आढळून आले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेहाच्या अंगावर कोणत्याही जखमा नसल्याचे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आले. मग, या मुलांचा बुडून मृत्यू झाला का?  याप्रकरणी कोपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – भिवंडीतून शाळकरी मुलगी बेपत्ता; पालक वर्गात चिंता


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -