घरताज्या घडामोडीज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचं वृद्धापकाळानं निधन

ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचं वृद्धापकाळानं निधन

Subscribe

ज्येष्ठ पत्रकार आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते दिनू रणदिवे यांचं निधन वृद्धापकाळानं निधन झालं आहे. ते ९५ वर्षांचे होते. त्यांनी आज सकाळी ११ वाजता दादर येथे त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. रणदिवे यांच्या निधनानंतर ‘फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड’ गमावल्याची भावना सामाजिक आणि पत्रकारिता वर्तुळात व्यक्त होत आहे.

निस्वार्थ पत्रकारितेचा आदर्श अशी त्यांची ओळख होती. १९२५ साली त्यांचा डहाणूतील आदिवासी भागात त्यांचा जन्म झाला होता. गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्याचा सक्रीय सहभाग होता. १९५६ साली पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. १९५५ मध्ये समाजवादी पक्षाने छेडलेल्या गोवा मुक्ती संग्रामातही सक्रिय होते. नंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा सक्रीय सहभाग राहिला तसेच या लढ्यात त्यांनी डांगे, आचार्य अत्रे यांच्या बरोबर कारावासही भोगला. संयुक्त महाराष्ट्र समितीने १९५६ साली संयुक्त महाराष्ट्र पत्रिका नावाचे अनियतकालिक सुरू केले.

- Advertisement -

रणदिवे यांच्या पत्रकारितेची सुरुवात येथूनच झाली होती. नंतर ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये रणदिवे रूजू झाले आणि महाराष्ट्र टाइम्सचे मुख्य वार्ताहर म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं. १५ सप्टेंबर १९८५ रोजी ते मटातून निवृत्त झाले, तोपर्यंत त्यांनी वार्तांकनात महत्त्वाचे मापदंड घालून दिले. १९७२ मध्ये रणदिवेंनी केलेले बांग्लादेश मुक्तिलढ्याचे वार्तांकनही गाजले होते. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र पत्रिका आणि लोकमित्र या नियतकालिकाचे संपादन त्यांनी केलं आहे.

अरुण साधू यांच्या ‘मुंबई दिनांक’ या कादंबरीत दिनू पत्रकार नावाचे एक पात्र आहे. ते रणदिवे यांच्या वरून बेतलं आहे. मग याचं कादंबरीवरून पुढे ‘सिंहासन’ सिनेमा आला आणि दिवंगत निळू फुले यांनी दिनू हे पत्रकार पात्र साकारलं होत. ही भूमिका अजरामर झाली होती.

- Advertisement -

पत्रकारितेतील वैभव गेले

ज्येष्ठ पत्रकार, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी दिनू रणदिवे यांच्या निधनाबद्धल मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला.
पत्रकारितेच्या माध्यमातून गरीब, श्रमिक वर्गावरील अन्यायाला वाचा फोडणारे आणि त्यांच्यासाठी प्रत्यक्ष मैदानात येऊन भांडणारे ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे गेल्याचे कळले आणि खूप दुःख झाले. पत्रकारितेतील वैभवच गेले आहे.
एक महिन्यापूर्वीच त्यांच्या पत्नीचे निधन झाल्याने त्यांच्यावर आघातच झाला होता. प्रत्येक लढ्यात त्यांची साथ असायची. संयुक्त महाराष्ट्र लढा ज्यांनी लढला, त्यासाठी कारावासही भोगला अशा दिनू रणदिवे यांचा संघर्षमय जीवन प्रवास हा पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. ठाकरे परिवाराशी त्यांचा स्नेह होता. स्व. बाळासाहेब यांच्याशी त्यांची नेहमी अनेक विषयांवर चर्चा व्हायची. त्यांच्या जाण्याने संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा एक मोठा दुवा निखळला आहे तसेच पत्रकारितेचे वैभव आपल्यातून गेले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक भावना व्यक्त केल्या आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -