घरफोटोगॅलरीअधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही विधानभवनाच्या पायऱ्यांवर गदारोळ

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही विधानभवनाच्या पायऱ्यांवर गदारोळ

Subscribe

राज्यात सत्ता बदल झाल्याने महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि शिंदे – फडणवीस सरकारची सत्ता स्थापन झाली. मंत्रिमंडळाचा विस्तार ते पावसाळी अधिवेश या दरम्यान राज्यात अनेक घडामोडी घडल्या विरोधी बाकावर बसलेल्या नेतेमंडळींनी सत्ताधाऱ्यांवर हल्लबोल केला.विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. यात आज शेवटच्या दिवशी सरकारमधील शिंदे गटाने थेट ठाकरे कुटुंबियांना टार्गेट केले आहे. आज सत्ताधारी शिंदे गटातील आमदारांनी ,प. पू. युवराज म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंना डिवचले आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवरून शिंदे गटातील आमदारांनी आदित्य ठाकरेंविरोधात बॅनरबाजी करत निशाणा साधला आहे. दरम्यान, त्यानंतर महाविकास आघाडी आमदारांनी देखील विधानभवन परिसरामध्ये पन्नास खोके… चिडलेत बोके… ओला दुष्काळ जाहीर करा… नाहीतर खुर्च्या खाली करा अशा तीव्र शब्दात सरकारवर टीका केली आहे.

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -