अनंत चतुर्दशी झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पितृपक्षाला सुरुवात होते. श्रावणानंतर येणाऱ्या भाद्रपद महिन्याचा वद्यपक्षात म्हणजे प्रतिपदा ते अमावास्या हा काळ पितृपक्ष किंवा पितृपंधरवडा म्हणून ओळखला जातो. पितृपक्ष म्हणजे दिवंगत पूर्वजांचे स्मरण करण्याचा हा काळ उत्तर भारतातील बहुतांश भागात पौर्णिमान्त महिने पाळले जातात. मात्र, दिवंगत झालेल्या व्यक्तीचे कधी श्राद्ध घालावे? ते कोणत्या तिथीला घालावे? हे आज आपण पाहणार आहोत.