परमबीर सिंह यांची बदली करुन त्यांची होमगार्ड विभागात बदली करण्यात आली.
मुंबई पोलीसांच्या इतिहासात वेगवेगळ्या घटनामुळे अनेकदा मुंबई पोलीसांची नाच्चकी झाली आहे. सध्या अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटक आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सचीन वाझे यांच नाव समोर आल्याने मुंबई पोलीसांवर शंका उपस्थित केल्या. याचा फटका मुंबई पोलीस आयुक्तांना बसला आणि महाविकासआघाडी सरकारकडून परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली. पोलीस विभागात सर्वात कमी महत्वाचा मानल्या जाणाऱ्या होमगार्ड विभागात बदली करण्यात आली. याआधीही अशाच प्रकारे अनेक अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. तर जाणून घेऊया पोलीस दलातील पॉवरफुल पद भूषवताना साइडलाईन झालेले IPS अधिकारी.