मुंबईत धावणाऱ्या मेट्रोमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होणार असून या मेट्रोच्या आवाजाचा सर्वांच त्रास होणार आहे. यामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदुषणाचा विचार करुन आज सांताक्रुझ, खार परिसरातील स्थानिक रहिवाशांनी मेट्रोला विरोध दर्शवला आहे. तसेच मुंबईत मेट्रो धावणार असेल तर ती अंडरग्राऊंड करावी अशी मागणी येथील स्थानिक रहिवाशांसहित विद्यार्थ्यांनी केली आहे.