घररायगडकाँग्रेस जनतेच्या दरबारातील लढाई जिंकेल; प्रदेश सचिव श्रीरंग बरगे यांचा विश्वास

काँग्रेस जनतेच्या दरबारातील लढाई जिंकेल; प्रदेश सचिव श्रीरंग बरगे यांचा विश्वास

Subscribe

घोटाळेबाजांचा पर्दाफाश करणार्‍या राहुल गांधी यांना मोदी सरकार लक्ष्य करुन त्यांच्यावर कारवाई करत आहे. पण काँग्रेस पक्ष अत्याचारी, जुलमी इंग्रज सत्तेला घाबरली नाही, मग मोदी सरकारला कशासाठी घाबरेल? लोकशाही, संविधान आणि देश वाचवण्याची ही लढाई आहे, काँग्रेस ही लढाई जनतेच्या दरबारातही लढेल व विजयी होईल असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव आणि काँग्रेसचे रायगड जिल्ह्याचे सह प्रभारी श्रीरंग बरगे यांनी काँग्रेसभवन येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

अलिबाग: घोटाळेबाजांचा पर्दाफाश करणार्‍या राहुल गांधी यांना मोदी सरकार लक्ष्य करुन त्यांच्यावर कारवाई करत आहे. पण काँग्रेस पक्ष अत्याचारी, जुलमी इंग्रज सत्तेला घाबरली नाही, मग मोदी सरकारला कशासाठी घाबरेल? लोकशाही, संविधान आणि देश वाचवण्याची ही लढाई आहे, काँग्रेस ही लढाई जनतेच्या दरबारातही लढेल व विजयी होईल असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव आणि काँग्रेसचे रायगड जिल्ह्याचे सह प्रभारी श्रीरंग बरगे यांनी काँग्रेसभवन येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
काँग्रेस पक्षाच्यावतीने राहुल गांधी यांच्या वरील कारवाई संदर्भात अलिबाग येथील बॅ. ए. आर. अंतुले भवन (काँग्रेस भवन) येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अ‍ॅड. प्रवीण ठाकूर, पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुदाम पाटील, रायगड जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर, रायगड जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. जे. टी. पाटील, काँगेसचे प्रदेश प्रतिनिधी मार्तंड नाखवा, सुभाष पाखरे, अलिबाग तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भास्कर चव्हाण, योगेश मगर, प्रभाकर राणे, श्रीकांत नाईक, प्रज्वल पडोळे यांच्या सह तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
राहुल गांधी यांनी ७ फेब्रुवारीला संसदेत अदानी घोटाळ्यासंदर्भात प्रश्न विचारले. यामध्ये अदानी उद्योग समुहात गुंतवलेल्या शेल कंपन्यातील हजार कोटी रुपये कोणाचे? हा प्रश्न विचारला व त्याच प्रमाणे यामध्ये एक चिनी नागरिकाचाही सहभाग आहे, हा चिनी नागरिक कोण? याची उत्तरे प्रधान सेवकांनी द्यायला हवी होती. कर नाही तर डर कशाला मात्र भाजपकडून या मुद्याला बगल दिली जात आहे. उद्योगपती गौतम अदानी व नरेंद्र मोदी यांचा संबंध सर्वश्रुत आहे. विमानतळ, संरक्षण क्षेत्र, ऊर्जा क्षेत्रात मोदी सरकारने अदानीला कशी मदत केली आहे. त्याचे पुरावे आहेत. ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांग्लादेश दौर्‍यात पंतप्रधान मोदींनी अदानीला सोबत घेऊन गेले व तेथील कंत्राटे देण्यासाठी दबाव आणला, याचे पुरावे राहुलजी गांधी यांनी कागदपत्रासह दिले आहेत असे श्रीरंग बरगे यांनी सांगितले.

राहुल गांधींवर खोटे आरोप
राहुल गांधी यांनी संसदेत अदानी घोटाळ्यावर मोदी सरकारला प्रश्न विचारल्यानंतर ९ दिवसानंतर राहुल गांधी यांच्या विरोधातील मानहानीचे प्रकरण बाहेर काढण्यात आले. राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आणि २४ तासातच त्यांची खासदारकी रद्द केली व आता सरकारी घर खाली करण्याची नोटीस पाठवली.मोदी सरकार राहुल गांधी यांच्यावर सुडबुद्धीने कारवाई करत आहे. अदानी घोटाळ्याची चर्चाच होऊ नये म्हणून भाजपा जाणीपूर्वक राहुल गांधींवर खोटे आरोप करून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवत आहे. असे श्रीरंग बरगे यांनी सांगितले.

- Advertisement -

जनतेचा प्रधान सेवक म्हणवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्योगपती अदानी यांच्या २० हजार कोटींच्या घोटाळ्यावर गप्प आहेत. एरवी विरोधकांना लक्ष करण्याची संधी न सोडणारे मोदी अदानी यांना पाठिशी का घालत आहेत ? असा सवाल उपस्थित होत आहे. अदानी उद्योगसमुहात शेल कंपन्यांची २० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूकीबाबत सरकारला धारेवर धरल्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर कारवाईला वेग आला हे सत्य नाकारता येणार नाही .
– श्रीरंग बरगे
सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -