घररायगडरायगड जिल्ह्यात तीन दिवसात गारठ्याचे

रायगड जिल्ह्यात तीन दिवसात गारठ्याचे

Subscribe

मुरूड तालुक्यासह जिल्ह्याचे तापमान गेल्या चार दिवसांपासून झपाट्याने खाली येत असून १४ ते १५ सेल्सियस इतके घसरले आहे. त्यामुळे मोठा गारठा पडला असून रात्री हुडहुडी भरत असल्याचे जाणवत आहे. दमट हवामान असणारा मुरूड तालुका समुद्र किनारी असूनही परवा येथील तापमान१६ ते१७ सेल्सियस इतके होते.

 

नांदगाव: काश्मीर,उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आदी पहाडी राज्यात जोरदार बर्फवृष्टी सुरू असून या राज्यात आगामी तीन ते चार दिवसात तापमान आधिक घसरून ३ सेल्सियस इतके खाली येण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. किनार्‍यालगत असलेल्या रायगड जिल्ह्यालाही याचा परिणाम होणार असून जनतेने सर्वतोपरी काळजी घेण्याचे आवाहनही या विभागाने केले आहे.
मुरूड तालुक्यासह जिल्ह्याचे तापमान गेल्या चार दिवसांपासून झपाट्याने खाली येत असून १४ ते १५ सेल्सियस इतके घसरले आहे. त्यामुळे मोठा गारठा पडला असून रात्री हुडहुडी भरत असल्याचे जाणवत आहे. दमट हवामान असणारा मुरूड तालुका समुद्र किनारी असूनही परवा येथील तापमान१६ ते१७ सेल्सियस इतके होते.हेच तापमान आता १४ ते १५ पर्यंत कमी-जास्त होत आहे.पहाडी राज्यात होणार्‍या बर्फवृष्टीच्या गारठ्याचा परिणाम महाराष्ट्र राज्यात देखील सर्वदूर होताना दिसत असून ठिकठिकाणी उष्णता मिळवण्यासाठी शेकोट्या पेटवल्या जात आहेत.गरम आणि उबदार कपड्यांना अचानक मागणी वाढली असून गारठा आधिक वाढण्याची चिन्हे स्पष्टपणे जाणवत आहेत. मोटरसायकल वरूनसोमवारी सायंकाळी उशिरा राजपुरी समुद्रकिनारी मार्गाने मुरूड कडे येताना थंडीने कुडकुडायला होत होते. बर्फवृष्टी जरी तीन हजार किलोमीटरवर असणार्‍या राज्यात होत असली तरी यामुळे तयार होत असलेले अतिथंड वारे समुद्रावरून आणि पहाडी किंवा घाटमाथ्यावर देखील धडकत असून तापमान झपाटयाने खाली येत आहे ही चिंतेची बाब आहे.गुलाबी आणि बोचरी अशी संमिश्र थंडी पडली असून पर्यटनाला हा काळ महत्वाचा मानला जात असल्याने पर्यटकांची वर्दळ वाढेल असा कयास पर्यटन व्यवसायिकांनी व्यक्त केला.

- Advertisement -

आता थंडीचा गारठा
रायगडात उरण,करंजा, श्रीवर्धन, अलिबाग, मुरूड, दिवेआगर, रेवदंडा, बोर्ली, काशीद,नांदगाव, किहीम, आक्षी, मोरा, आगरदांडा, दिघी,हरिहरेश्वर, नागाव, मांडवा आदी समुद्रकिनारी पट्टयात गुलाबी थंडी असल्याने शैक्षणिक सहली आणि पर्यटकांचा ओघ सुरू झाला आहे.सुरक्षित पर्यटन करा. आगामी तीन ते चार दिवसात आधिक गारठा वाढण्याची शक्यता असल्याने बाहेर फिरायला जाताना उबदार कपडे, आवश्यक औषधे, घेणे हिताचे आहे. यंदा कडक उन्हाळा, भरपूर पाऊस आपण अनुभवला. आता थंडीचा देखील मोठा गारठा सहन करावा करावा लागणार असे सिग्नल मिळत आहेत.

समुद्रात रात्री मासेमारीस जाणार्‍या मच्चीमारांना तर रात्रभर थंडीत कुडकुडत मोठा सामना करावा लागत असल्याची माहिती मुरूड येथे मच्छीमारांनी दिली.येणारा गारठा कसा असेल हे सांगता येणार नाही परंतु पुरेशी काळजी घेणे मात्र आवश्यक आहे. आजारी व्यक्तींना अशा गारठ्याचा मोठा त्रास होऊ शकतो. म्हणून इशार्‍या कडे दुर्लक्ष करू नका.घटलेली हवेतील आद्रता आणि उत्तरेकडून येणारे थंड वारे यामुळे थंडीची तीव्रता वाढती राहील.
-अभिजित मोडक,
खाजगी हवामान तज्ज्ञ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -