घरक्रीडाजम्मू काश्मिरकडून महाराष्ट्राचा पराभव

जम्मू काश्मिरकडून महाराष्ट्राचा पराभव

Subscribe

रणजी करंडक,गोलंदाजांची चमक

येथे सुरू असलेल्या रणजी करंडक स्पर्धेच्या ‘क’ गटात जम्मू-काश्मीर संघाने महाराष्ट्राच्या संघाला उत्तम गोलंदाजीच्या जोरावर चांगलाच दणका दिला. या सामन्यात जम्मू-काश्मीरने महाराष्ट्राचा ५४ धावांनी पराभव केला. महाराष्ट्राकडून २१ वर्षीय दिग्विजय देशमुख याने ८३ धावांची दमदार खेळी केली. मात्र, तोही संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही. त्यामुळे स्पर्धेतील महाराष्ट्राचा हा सलग दुसरा पराभव आहे.महाराष्ट्राचा पुढील सामना २५ डिसेंबरपासून छत्तीसगडविरुद्ध रंगणार आहे.

जम्मू-काश्मीरने प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राच्या संघासमोर ३६४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्राचा संघ ३०९ धावांवर आटोपला. सामन्यांत एकूण ९ बळी घेणारा नझीर ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी ठरला. गुरुवारच्या ५ बाद १९२ धावांवरून पुढे खेळताना, नाबाद असलेल्या अंकित बावणे एक धावांची भर घालून परतला. त्यानंतर आठव्या स्थानावर आलेल्या दिग्विजयने ७१ चेंडूंतच ८३ धावा केल्या. सामन्यात महाराष्ट्र विजयी ठरणार असे वाटत असताना, नझीरने दिग्विजयला बाद केले.

- Advertisement -

दिग्विजयने आपल्या खेळीत ७ चौकार आणि ५ षटकार लगावले. त्यानंतर महाराष्ट्राच्या तळातील फलंदाजाना जम्मू-काश्मीरच्या गोलंदाजांनी फार काळ टिकू दिले नाही. जम्मू-काश्मीरकडून नझीर आणि मोहम्मद मुद्दसिर यांनी प्रत्येकी ४ गडी बाद केले. रणजी करंडक स्पर्धेत जम्मू-काश्मीरचा संघ सलग दोन विजयांसह गुणतालिकेत चौथे स्थान मिळवले आहे, तर महाराष्ट्र मात्र सलग दुसर्‍या पराभवामुळे आठव्या स्थानी घसरला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -