घरIPL 2020IPL 2020 : हैदराबादने आम्हाला 'चारी मुंड्या चीत' केले - श्रेयस अय्यर

IPL 2020 : हैदराबादने आम्हाला ‘चारी मुंड्या चीत’ केले – श्रेयस अय्यर

Subscribe

हैदराबादने दिल्लीला १५ धावांनी पराभूत केले.  

सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या आयपीएल लढतीत दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना १६२ धावा केल्या आणि त्यांनी दिल्लीला १४७ धावांवर रोखत हा सामना १५ धावांनी जिंकला. दिल्लीच्या संघाला यंदा आयपीएल जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात असून त्यांनी या मोसमाची सुरुवातही सलग दोन विजयांनी केली होती. परंतु, अबू धाबी येथे झालेल्या या सामन्यात मात्र हैदराबादने दिल्लीला अगदीपणे पराभूत केले. त्यामुळे हैदराबादने या सामन्यात प्रत्येकच क्षेत्रात आमच्यापेक्षा चांगला खेळ केला, असे दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरला सामन्यानंतर म्हणावे लागले.

अबू धाबीमध्ये आमचा पहिलाच सामना

आम्ही हैदराबादला १६२ धावांवर रोखले. या खेळपट्टीवर इतक्या धावा करून आम्ही सामना जिंकू शकतो असे मला वाटत होते. अबू धाबीमध्ये आमचा हा पहिलाच सामना होता. त्यामुळे या खेळपट्टीवर कसे खेळले पाहिजे हे आम्हाला ठाऊक नव्हते. हैदराबादने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रांमध्ये आमच्यापेक्षा चांगला खेळ केला. त्यामुळेच ते सामना जिंकले. त्यांना श्रेय दिले पाहिजे, असे अय्यर म्हणाला.

- Advertisement -

दव पडेल असे वाटलेले 

दुसऱ्या डावात फलंदाजी करणे अवघड झाले होते. दुसऱ्या डावात दव पडेल आणि त्यामुळे चेंडू फाटकावणे सोपे होईल असे आम्हाला वाटले होते. मात्र, फलंदाजीला उतरल्यावर चेंडू ज्या वेगाने बॅटवर येत होता ते पाहून मला आश्चर्यच वाटले. असे असले तरी आम्ही हा सामना जिंकू शकत होतो. हे मैदान मोठे आहे. त्यामुळे आम्ही दोन धावा काढण्यावर भर दिला पाहिजे होता आणि ते आम्ही केले नाही, असेही अय्यरने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -