भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा टी-२० सामना गुरुवारी खेळला जात आहे. या सामन्यात मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने २० षटकांत ८ बाद १८५ अशी धावसंख्या उभारली. सूर्यकुमारने या मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मात्र, त्याला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. आजच्या सामन्यात मात्र त्याला तिसऱ्या स्थानावर बढती मिळाली आणि या संधीचे त्याने सोने केले. सूर्यकुमारने ३१ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५७ धावांची खेळी केली. हे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले अर्धशतक ठरले. त्यामुळे भारताने १८० धावांचा टप्पा पार केला.
#TeamIndia post 1⃣8⃣5⃣/8⃣ on the board in the 4th @Paytm #INDvENG T20I! @surya_14kumar 5⃣7⃣@ShreyasIyer15 3⃣7⃣
The England chase shall commence soon.
Scorecard 👉 https://t.co/TYCBHIV89r pic.twitter.com/8tO0GRg902
— BCCI (@BCCI) March 18, 2021
पंत, अय्यरची फटकेबाजी
या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा (१२) आणि लोकेश राहुल (१४) यांना फार धावा करता आल्या नाहीत. तर मागील दोन सामन्यांत अर्धशतके करणारा भारताचा कर्णधार विराट कोहली केवळ १ धाव करून माघारी परतला. सूर्यकुमारने मात्र दुसऱ्या बाजूने अप्रतिम फलंदाजी करत २८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तो बाद झाल्यावर अखेरच्या षटकांत रिषभ पंत (३०) आणि श्रेयस अय्यर (३७) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने २० षटकांत ८ बाद १८५ अशी धावसंख्या उभारली. इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने ४ विकेट घेतल्या.