- Advertisement -
शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना पावसामुळे नुकसान झाल्यास भरपाई मिळणं सोपं होईल, असा दावा सरकारने केला. मात्र, किसान सभेने सरकारचे हे दावे फेटाळत नव्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही, असा आरोप केला. अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉ अजित नवलेंनी भूमिका मांडली.
- Advertisement -