- Advertisement -
केंद्र सरकारने सर्व राज्यांना आर्थिक मदत करताना एकसारखी भूमिका घ्यावी. तौक्ते चक्रीवाळाच्या वेळी पंतप्रधान मोदींनी तात्काळ १ हजार कोटींची मदत केली होती. परंतु सर्वच राज्यांना तात्काळ मदत केली तर सर्वच राज्यांना उपयुक्त ठरेल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटंल आहे. मराठवाडा, विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं असून तेथे वेगाने पंचनामे करण्यात येत आहेत. शक्य नसेल तिथे ड्रोनद्वारे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जलयुक्त योजनेवर होणाऱ्या आरोपांवर देखील अजित पवारांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. शेतकऱ्यांच्या मदतीवरुन अजित पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
- Advertisement -