- Advertisement -
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोना प्रादुर्भावाचीही साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. परंतु, काही जिल्ह्यात नागरिक नियमांचे पालन करत नसल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. दरम्यान, बारामती, सांगली, सातारा आणि अहमदनगरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आणि कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे पुढील ७ दिवस अधिक कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामध्ये मेडिकल आणि दवाखाने वगळता सर्व दुकाने, अस्थापना बंद ठेवण्यात आली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि मृत्यूदर आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.
- Advertisement -