- Advertisement -
50 खोक्यांचा मुद्दा पुन्हा एकदा तापू लागलाय. ठाकरे गटाने शिंदे गटावर खोक्यांच्या मुद्यावरून हल्ला केला तर, आता शिंदे गटातील आमदार देखील ठाकरे गटावर खोक्यांचा उल्लेख करत अनेक सूचक वक्तव्य करत आहेत. यातच मंत्री दीपक केसरकर यांनी तर ठाकरे गटाला फैलावर धरले आहे. ‘खोक्यांची भाषा बंद करा. एकदा का आमचा संयम सुटला तर मग कळेल खोके कुणाकडे गेले?’ असं विधान केसरकरांनी केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी देखील याच पार्श्वभूमीवर भाष्य करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
- Advertisement -