- Advertisement -
‘तौक्ते चक्रीवादळा’मुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची आज राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी पाहणी केली. कोकणातील वैभववाडी, मालवण, वेंगुर्ला तालुक्यात पाहणी करताना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून त्यांनी येथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत उपस्थित होते. ‘सरकार आपल्या पाठीशी आहे नुकसानभरपाई लवकरात लवकर दिली जाईल’, असे आश्वासन त्यांनी यावेळी जिल्ह्यातील नुकसानग्रस्थाना दिले आहे.
- Advertisement -