- Advertisement -
दिल्लीमधील वायु प्रदुषणात वाढ झाली असून सोमवारी दिल्ली सरकारने लॉकडाऊन करण्यासाठी तयार असल्याचे सांगितले आहे. एनसीआरमध्ये लॉकडाऊन केल्यास दिल्लीत कडक लॉकडाऊन करण्यात येईल अशी माहिती केजरीवाल सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. दरम्यान, दिल्लीपाठोपाठ आता मुंबईमध्ये देखील प्रदुषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच दक्षिण मुंबईतील हवेची गुणवत्ता तर दिल्लीपेक्षाही बिकट असल्याची माहिती वायू प्रदूषण तज्ञांनी दिली आहे.
- Advertisement -