- Advertisement -
राजकारण्यांबरोबरच पोलिसांवरचाही विश्वास उडाला असून केवळ न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे, असे धक्कादायक वक्तव्य पालकमंत्री गिरीश बापट यांनी राजगुरुनगर येथील न्यायलयात आयोजित कार्यक्रमात केले होते. राजगुरु नगर येथे केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ माय महानगरच्या हाती लागलेला आहे. या व्हिडिओत बापट वकिलांना स्पष्टपणे म्हणातायत की, “तुम्ही चांगले काम करत आहात. न्यायसंस्थेवर लोकांचा अजूनही विश्वास आहे. आमच्यावरचा विश्वास उडाला आहे. राजकारणी आणि पोलीस यंत्रणेवरचा लोकांचा विश्वास उडालेला आहे.” स्पष्टवक्ते म्हणून प्रसिद्ध असलेले गिरीश बापट यांनी याआधीही आमची सत्ता आहे तोपर्यंत काम करुन घ्या, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.
- Advertisement -