- Advertisement -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळाने १६९ मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. विरोधात शून्य मतदान झाले तर चार आमदारांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. सभागृहात बहुमत चाचणीच्या वेळी मनसेचा एकमेव आमदार काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष होते. बहुमत चाचणी होत असताना मनसेचे कल्याण ग्रामीणचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.
- Advertisement -