- Advertisement -
गलवान खोऱ्यात भारतीय सैन्याकडून पुलाचे बांधकाम सुरू असतांना या ठिकाणी सचिन मोरे संरक्षणासाठी कार्यरत होते. दरम्यान, या भागातील नदीला चीनकडून अचानक पाणी सोडण्यात आल्याने पाण्याची पातळी वाढल्याने दोन जवान त्यात वाहून जात होते. त्यांना वाचवण्यासाठी सचिन यांनी पाण्यात उडी घेतली. या वेळी दोघांना वाचवताना त्यांना वीरमरण प्राप्त झाले.त्यांच्यावर आज त्यांच्या मुळगावी साकोरी झाप येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
- Advertisement -