लॉकडाऊनमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. चहासारख्या शुल्लक कारणावरून झालेल्या वादात पतीने पत्नीची गळा चिरून हत्या केली आहे.
४० वर्षीय पतीने आपल्या ३५ वर्षीय पत्नीशी वाद झाला. चहावरून झालेल्या वादात त्याने पत्नीची हत्या केल्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. बायकोने दिलेल्या चहामध्ये साखर कमी असल्यामुळे पती बबलू कुमारला राग आला. त्याने तिच्याशी वाद घातला आणि पत्नी रेणूला मारहाण केली. त्याचा राग अनावर झाला आणि त्याने नंतर धारदार शस्त्राने तिचा गळा कापला.
आपल्या आईला वाचवायला तीन मुलं धावली खरी पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आईकडे जाईपर्यंत ती रक्ताच्या थारोळ्यात स्वयंपाकघरात तडफडत होती. अखेर आईने आपल्या मुलांदेखत प्राण सोडला. घटना झाल्यानंतर आरोपी पतीने तेथून पळ काढला. बबलूचं रेणूशी १२ वर्षांपूर्वी रेणूशी लग्न झालं होतं. या दोघांनाही तीन मुलं झाली.
या सगळ्या घटनेनंतर रेणूचे वडील बद्री प्रसाद यांच्या तक्रारीवरून बबलूविरोधात आयपीसीच्या कलम ३०२ (खून) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा शोध घेत आहेत.
हे ही वाचा – कोरोनाबाबत WHO ने जगाला दिली गुड न्यूज, लसीबाबत केली मोठी घोषणा!