- Advertisement -
उद्धव ठाकरेंना बोलताना पाहूनच विरोधकांची झोप उडाली आहे. विरोधकांकडून टीका होत होती की, त्यांना बोलता, चालता येत नाही. पण मुख्यमंत्री कार्यालयात चालत आले आणि शिवसेनेला, महाराष्ट्राला, राष्ट्राला संबोधित केले. असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. तसेच शिवसेना स्वबळावर पुढे जाईल आणि देशाच्या राजकारणात आत्मविश्वासाने पावल पुढे टाकेल . शिवसेनेची पावले दिल्लीच्या दिशेने आहेत. आगामी काळात शिवसेनेचा विस्तार, संघर्ष करण्यासाठी पावले उचलणार असल्याचेही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
- Advertisement -