- Advertisement -
पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील साडेचारशेहून अधिक शिक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली झाली आहे. पण, बाहेरून अद्याप येथे शिक्षक आलेले नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या किमान शंभर शाळा शिक्षक नसल्याने बंद पडण्याची भीती आहे.
- Advertisement -