विधानसभा निवडणुकांच्या आधी इव्हीएमविरोधात रान उठवणाऱ्या काँग्रेसने आज मतजदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाकडे तब्बल २२१ तक्रारी केल्या आहेत. यात इव्हीएम मशीन बंद पडण्याच्या जशा तक्रारी आहेत, तशाच सेना-भाजपच्या उमेदवारांनी आचारसंहितेचा भंग केल्याच्या देखील तक्रारी आहेत. वरळी विधानसभा मतदारसंघात सकाळपासून ६ मतदान यंत्र बंद पडल्याचा देखील प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसच्या या तक्रारींवर आयोगाकडून काय पाऊल उचलले जाते, याची चर्चा सध्या सुरू आहे.
कुठे किती तक्रारी?
अचलपूर – १
ऐरोली – १
अकोला पूर्व – १
अकोला पश्चिम – १
अकोट – ३
आंबेगाव – १
अमरावती – ४
अंधेरी पश्चिम – १
अणुशक्तीनगर – १
औरंगाबाद – १३
औसा – १
बाळापूर – ३
भोकर – ५
बोरीवली – १
बुलढाणा – २
भायखळा – १
चांदिवली – ३
चंद्रपूर – ४
चिखली – १
चिमूर – १
चोपडा – १
कुलाबा – १
धुळे शहर – १
दिंडोशी – ३
गडचिरोली – १
घाटकोपर – २
गोरेगाव – २
कोल्हापूर उत्तर – ६
कोल्हापूर दक्षिण – २
कर्जत-जामखेड – ३
जालना – ४
हिंगणघाट – २
जामनेर – १
जोगेश्वरी पूर्व – २
कराड उत्तर – १
कसबा पेठ – २
करवीर – १
खामगाव – २
किणवट – १
कोपरी पाचपाखाडी – १
कुर्ला – १
वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये सकाळच्या सुमारास बीडीडी चाळीमध्ये असलेल्या ६२ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर ६ वेळा मशीन बिघडल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाचे उमेदवार सुरेश माने यांच्याकडून त्या मतदान केंद्रात फेरमतदान करण्याची मागणी करण्यात आली आहे.