घरमुंबईपुन्हा निवडणूक घ्या; मनसे नेता संदिप देशपांडे यांची मागणी

पुन्हा निवडणूक घ्या; मनसे नेता संदिप देशपांडे यांची मागणी

Subscribe

राज्यातल्या चारही प्रमुख पक्षांची नैतिक पातळी घसरली आहे, त्यामुळे एक राजकीय कार्यकर्ता आणि मतदार म्हणून पुन्हा एकदा जनादेश घ्यायला हवा, अशी पोस्ट संदीप देशपांडे यांनी आपल्या फेसबूकवर शेअर केली आहे. महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्तापेचावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. गेल्या महिन्यातील २४ ऑक्टोबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. दिलेल्या वेळेत कोणत्याही पक्षाने सरकार स्थापन करण्यात असमर्थता दर्शवल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याची तयारी दाखवली. मात्र शनिवारी सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना मुख्यमंत्री आणि उप-मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. या घटनेनंतर राज्यात मोठा भूकंप झाला.

- Advertisement -

नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संदीप देशपांडे मनसेच्या तिकीटावर रिंगणात होते. मात्र दादर-माहित मतदारसंघात शिवसेनेच्या सदा सरवणकरांकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकच उमेदवार राजू पाटील हे कल्याण ग्रामीण मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

हेही वाचा –

‘प्रश्न कौटुंबिक असो की राजकिय; खचून जाणं हे साहेबांच्या डिक्शनरीत नाही’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -