‘मुख्यमंत्री एवढे मस्तवाल झाले आहेत की त्यांना भाजप आणि निवडणुका याव्यतिरिक्त काहीच दिसत नाही’, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. बुधवारी पुणे आणि नाशिकमध्ये झालेल्या पावसाने हाहा:कार उडाला असून त्यामध्ये आतापर्यंत ११ जणांचा बळी गेला आहे. या घटनेवर बोलताना नवाब मलिक यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
हेही वाचा – पुण्यात पूर; पण मुख्यमंत्री आणि पालकमंत्री खूपच दूर!
नेमके काय म्हणाले नवाब मलिक?
‘महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन झोपलेले आहे. त्यामुळे पुणे नाशिक येथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत झालेली पुरपरिस्थिती असेल किंवा महालक्ष्मी एक्स्प्रेसचा प्रसंग असेल त्यावेळी आपत्ती व्यवस्थापन झोपलेले होते. ही परिस्थिती हाताळण्याचे काम मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांची आहे. परंतु, हे लोक दिल्लीत जावून बसतात’, असे नवाब मलिक म्हणाले. त्याचबरोबर ‘जनतेवर कितीही संकटे आली तरी याची चिंता यांना नाही. त्यांना चिंता फक्त निवडणुकीत सत्तेत कसे यायची याची आहे’, असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला.
महाराष्ट्राचा आपत्ती व्यवस्थापन विभाग झोपलेला असल्यामुळेच पुण्यात पूरस्थिती निर्माण झाली. सांगली-कोल्हापूर मधील पूर, महालक्ष्मी एक्सप्रेस अडकली असतानाही सरकार निद्रावस्थेत होते, अशी टीका राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांनी केली. @nawabmalikncp @MumbaiNCP @NCPspeaks @CMOMaharashtra pic.twitter.com/XFoezSCEP2
— My Mahanagar (@mymahanagar) September 26, 2019
हेही वाचा – Live Update – पुण्यात पावसाचा कहर; १२ जणांचा मृत्यू