पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने तीन राज्यावर आपली सत्ता स्थापन करण्यात यश मिळवले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने भाजपच्या बालेकिल्ल्यात घवघवीत यश मिळवले आहे. या पाचही राज्याच्या निवडणुकी निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. मोदींनी पराभव मान्य केला असून काँग्रेसला विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Prime Minister Narendra Modi tweets: We accept the people’s mandate with humility. I thank the people of Chhattisgarh, Madhya Pradesh & Rajasthan for giving us the opportunity to serve these states. BJP Governments in these states worked tirelessly for the welfare of the people. https://t.co/FBvncnwCRY
— ANI (@ANI) December 11, 2018
पंतप्रधान यांनी केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, ‘आम्ही नम्रतेने जनतेचा जो कौल आहे त्याचा स्वीकार करतो. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या जनतेने आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या राज्यातील भाजपा सरकारनी जनतेच्या कल्याणासाठी अथक मेहनत घेतली असे मोदी यांनी म्हटले आहे.’