घरक्रीडाआशियाई चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडे, मात्र सामने होणार युएईमध्ये!

आशियाई चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडे, मात्र सामने होणार युएईमध्ये!

Subscribe

पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यात होणार्‍या आशियाई चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडे सोपवण्यात आले आहे. सिंगापूर येथे आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पाकिस्तानला यजमानपद मिळाले असले तरी ही स्पर्धा युएईमध्ये होण्याची शक्यता आहे. जर ही स्पर्धा पाकिस्तानमध्येच झाली, तर गतविजेता भारत या स्पर्धेत सहभागी होणार नाही अशी शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान देशांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळल्या जात नाहीत, पण हे संघ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये एकत्र सामने खेळतात. मागील वर्षी युएईमध्येच झालेल्या स्पर्धेत भारताने अंतिम फेरीत बांगलादेशवर मात करत या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. मागील वर्षी ५०-५० षटकांची झालेली ही स्पर्धा पुढील वर्षी २०-२० षटकांची होईल.

२००८ साली भारताने पाकिस्तानमध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. त्यानंतर अतिरेकी हल्ल्यांमुळे भारताने पाकसोबत खेळण्यास नकार दिला. मध्यंतरी बीसीसीआयच्या क्रिकेट प्रशासकीय समितीने आयसीसीला पत्र लिहीत दहशतवादाला खतपाणी घालणार्‍या देशांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यामुळे आशिया चषकासारख्या महत्वाच्या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे देण्याच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

- Advertisement -

बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी सिंगापूरला झालेल्या बैठकीत हजर होते. या बैठकीत भारत-पाक यांच्यामधील राजकीय संबंध न सुधारल्यास स्पर्धा त्रयस्थ ठिकाणी हलवण्याचा पर्याय सुचवण्यात आला आहे. याच बैठकीत २०२२ एशियाडमध्ये क्रिकेटचा समावेश करावा याबद्दलही चर्चा करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -