भिवंडी शहर परिसरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये रोजच्या रोज बेसुमार वाढ होत असताना दिसत आहे. अशीच एक घटना भिंवडीतील वंजारपट्टी नाका परिसरात घडली आहे. भिवंडीतून दोन मालवाहू ट्रकची चोरीस गेल्याची घटना घडली आहे. या वाढत्या वाहन चोरीच्या घटनांनी ट्रान्सपोर्ट मालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नेमके काय घडले?
ईदगाह रोड येथील ट्रान्सपोर्ट मालक शफिक सलीम शेख यांनी त्यांच्या मालकीच्या आयशर मालवाहू ट्रक शानदार मार्केटच्या समोर पार्किंग करून ठेवलेला असताना तो ट्रक दोन अज्ञात चोरट्यांनी २६ ते ३० जूनच्या दरम्यान चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. यातील एक ट्रक ४ लाख तर दुसरा ३ लाख किंमतीचा असल्याची माहिती समोर आली आहे. पाऊस पडत असल्याने ट्रक मालकांने दोन्ही ट्रक त्याच्या नेहमीच्या ठिकाणी उभे केले होते. मंगळवारी सकाळी त्यांची पाहणी करण्यासाठी ट्रान्सपोर्ट मालक शफिक हे गेले असता त्यांना दोन्हीं ट्रक जागेवर दिसून आले नाही. त्यामुळे त्यांनी ट्रकचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, शोध घेऊन देखील ट्रक आढळून आले नाही. त्यामुळे ते ट्रक चोरीला गेल्याची शंका येताच ट्रक मालकांनी याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात ट्रक चोरीस गेल्याची तक्रार देऊन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सचिन खताळ अधिक तपास घेत आहेत.
हेही वाचा – स्वयंपाकाच्या कारणावरुन विवाहितेची आत्महत्या