- Advertisement -
राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना दिलेली शपथ बेकायदेशीर असून विधीमंडळात बहुमताची चाचणी घेण्यात यावी, या मागणीकरीता शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे तीनही पक्ष तोंडावर पडले असल्याची प्रतिक्रिया अॅड. आशिष शेलार यांनी दिली आहे. तसेच अजित पवार यांची गटनेतेपदी केलेली नियुक्ती वैध असून त्यांनी काढलेला व्हिप राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना बंधनकारक असेल असेही शेलार यांनी सांगितले.
- Advertisement -