अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या लग्नाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरदार सुरू आहे. मात्र अदयाप कपूर आणि भट कुटूंबाकडून कोणतेच कन्फमेशन देण्यात आलेलं नाही. मात्र आता या दोघांच्या लग्नाचं गुपीत अभिनेत्री दीपिका पदुकोणने उघड केलं आहे. खरं तर आलिया आणि रणबीर त्याच्या लग्नाची बातमी गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करत होते मात्र दीपिकानं एका मुलाखतीमध्ये रणबीर-दीपिकाच्या लग्नाबाबत खुलासा केला. त्यावरुन तरी हे दोघं लवकरच लग्नाच्या बेडीत अडकतील असा अंदाज लावला जात आहे.
काही दिवसांपूर्वी दीपिका,आलिया,रणवीर सिंग,आयुषमान खुराणा,मनोज वाजपेयी,साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा,पर्वती तिरूवोतो आणि विजय सेतुपती फिल्म कंपनीयने होस्ट केलेल्या एका मुलाखतीत एकत्र दिसले. ज्यात होस्टनं इंडियन सिनेमातील असा कोणता अभिनेता किंवा अभिनेत्री आहे ज्याच्याकडून तुम्ही सल्ला घ्यावासा वाटतो असा प्रश्न सर्व स्टार्सना विचारला. ज्यावर उत्तर देताना विजय देवरकोंडा म्हणाला, ‘न लाजता मी एक गोष्ट सांगेन की, इथं बसलेल्या काही लोकांवर मला क्रश होता. मी दीपिका आणि आलियाच्या प्रेमात होतो. पण दीपिकाचं लग्न झालं आहे.’ यावर दीपिका मध्येच बोलली, ‘…आणि आलियाचं होणार आहे.’ दीपिकाने आलियाच्या लग्नाविषयी हे वक्तव्य करुन अनेकांच्या नजरा या दोघींकडे वळल्या.
दीपिकाने केलेल्या या वक्तव्यामुळे आलिया लवकरच रणबीरसोबत लग्न करणार असल्याचं निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे चाहते रणबीर-आलियाचं लग्न नक्की कधी होतं याकडे लक्ष लावून बसले आहेत.दीपिका लवकरच ‘छपाक’ या चित्रपटात झळकणार आहे. तर आलिया आणि रणबीर ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे.