१४ एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाऊनच्या काळात घरी बसून काय करायचं हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. मात्र टिव्ही वाहिन्यांनी हा प्रश्न सोडवला आहे. लोकांची मागणी बघून अनेक मालिकांचे पुन: प्रक्षेपण सुरू करण्यात आले. यात रामायण, महाभारत, चिमणराव आणि गुंड्याभाऊ या मालिकांबरोबरच झी मराठीवरील अनेक मालिकांचे पुन: प्रक्षेपण सुरू झाले. मात्र ९०च्या काळात ज्याप्रमाणे रामायण मालिकेवर प्रेक्षकांनी प्रेम केलं तेच प्रेम पुन्हा एकदा मालिकेला मिळाल्याचे दिसून आले.
This is a record of sorts for Doordarshan since BARC started TV Audience Measurement in 2015 underscoring how India is watching DD even as India fights back #CORONA #StayHomeToStaySafe
— Shashi Shekhar (@shashidigital) April 2, 2020
९० च्या काळात रामायण सुरू झाल्यावर रस्त्यावर शुकशुकाट असायचा हे आपण ऐकले आहे. पण हीच रामायणाची क्रेझ आजही आहे. याचा अनुभव २०२० मधील प्रेक्षकांनीही घेतला. टीआरपीच्या चार्टमध्ये रामायण या धार्मिक मालिकेने इतर सर्व मनोरंजन वाहिन्यांना मागे टाकले आहे आणि टीआरपीचे सर्व विक्रम मोडीले आहेत.
प्रसार भारतीचे सीईओ शशी शेखर यांनी ट्विटरवर याची माहिती दिली. ते म्हणाले, सध्या तरी रामायणला टक्कर देणारा अन्य कुठलाही शो कुठेही नाही. गेल्या पाच वर्षांत म्हणजे २०१५ पासून आत्तापर्यंत मनोरंजन श्रेणीत रामायण बेस्ट शो ठरला आहे. त्याचप्रमाणे BARCIndia च्या हवाल्याने देखील ही माहिती दिली आहे.
रामायणाची वाढती क्रेझ
१९८८ साली रामायण या मालिकेने अनोखा इतिहास रचला होता. रामानंद सागर यांच्या या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होतं. विशेषत: प्रभू रामाची भूमिका प्रचंड गाजली होती. इतकी की, लोकांनी आपल्या घरात राम आणि सीतेच्या तसबीरीच्या रूपात अरूण गोविल आणि दीपिकाचे फोटो लावले होते. आजही लोक श्रद्धाभावाने अरूण गोविल यांच्या पाया पडतात.
हे ही वाचा – रामायणाच्या ‘या’ पात्राची स्वरा भास्करशी तुलना, सोशल मीडियावर ट्रोल!