भारत-चीन हिंसक झटापटीनंतर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. चीनने भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत, असा सवाल केला जात आहे. दरम्यान, आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. चीनने भारताच्या भूमीत घुसून आपल्या सैनिकांना मारलं. त्यामुळे चीनला धडा शिकवायला पाहिजे, असेही आव्हाड म्हणाले आहेत.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत मोदींना लक्ष्य केलं आहे. “चीनने भारताच्या भूमीत घुसून आपल्या सैनिकांना मारलं आहे. अशावेळी चीनला धडा शिकवला पाहिजे. मोदींसोबत संपूर्ण देश आहे. आता मोदींनीही आक्रमक होऊन चीनला धडा शिकवला पाहिजे. झोपाळ्यावर बसून झालं. आता चीनकडे ‘लाल आंखे’ करून पहायची वेळ आली आहे. काय म्हणता?” असं ट्विट आव्हाड यांनी केलं आहे.
चीनने भारताच्या भूमीत घुसून आपल्या तीन सैनिकांना मारलं आहे. अशावेळी चीनला धडा शिकवला पाहिजे. मोदींसोबत संपूर्ण देश आहे. आता मोदींनीही आक्रमक होऊन चीनला धडा शिकवला पाहिजे.
झोपाळ्यावर बसून झालं. आता चीनकडे “लाल आंखे” करून पहायची वेळ आली आहे. काय म्हणता?
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 16, 2020
हेही वाचा – पंतप्रधान आज उद्धव ठाकरेंसह इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार
दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसनेही या घटनेवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. “लहानसहान गोष्टींवर ट्विट करणारे पंतप्रधान शहीद जवानांबद्दल चकार शब्दही काढायला तयार नाहीत! पंतप्रधानांच्या मौनव्रताने वर्तमान प्रश्न सुटणार नाही. तर त्यासाठी विषयाची जाण, दूरदर्शिता, मुत्सद्देगिरी, नियोजन, राजकीय इच्छाशक्ती आणि योग्य परराष्ट्र धोरणाची गरज आहे”, अशा आशयाचं ट्विट करत महाराष्ट्र काँग्रेसने मोदींवर टीकेची तोफ डागली आहे.
लहानसहान गोष्टींवर ट्वीट करणारे पंतप्रधान शहीद जवानांबद्दल चकार शब्दही काढायला तयार नाहीत!
पंतप्रधानांच्या मौनव्रताने वर्तमान प्रश्न सुटणार नाही. तर त्यासाठी विषयाची जाण, दूरदर्शिता, मुत्सद्देगिरी, नियोजन, राजकीय इच्छाशक्ती आणि योग्य परराष्ट्र धोरणाची गरज आहे.#WeakestPMModi
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) June 16, 2020