घरमुंबईराधाकृष्ण विखे - पाटलांना अटक करा; सनातन संस्थेची मागणी

राधाकृष्ण विखे – पाटलांना अटक करा; सनातन संस्थेची मागणी

Subscribe

काँग्रेसच्या उतावीळ नेत्यांकडून सातत्याने सनातनवर बंदी घाला आणि सनातनच्या प्रमुखांना अटक करा, अशी मागणी केली जात आहे. सूड घेण्याच्या भावनेतून विखे-पाटलांची ही धडपड चालू आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटलांनाच अटक करा, अशी मागणी सनातन संस्थेने केली आहे.

कालपासून काँग्रेसच्या उतावीळ नेत्यांकडून सातत्याने सनातनवर बंदी घाला आणि सनातनच्या प्रमुखांना अटक करा ! अशी मागणी केली जात आहे. काँग्रेसच्या नेत्यांची मागणी ही स्वतःची कातडी बचाव करण्यासाठी सनातनला लक्ष्य करण्यासारखी आहे. सनातन संस्थेने २०१५ आणि मार्च २०१८ मध्ये विखे-पाटलांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड केली. दुर्दैवाने भाजप शासनानेही अद्याप यावर काहीही कारवाई केली नाही. याचाच सूड घेण्याच्या भावनेतून विखे-पाटलांची ही धडपड चालू आहे. त्यामुळे आधी राधाकृष्ण विखे पाटलांनाच अटक करा, अशी मागणी सनातन संस्थेने केली आहे. यासंबंधीचे प्रसिद्धी पत्रक सनातनने जारी केले आहे.

काँग्रेसवर सनातनचे आरोप 

सनातन संस्थेच्या प्रमुखांना अटक करा अशी मागणी करण्याचा नैतिक अधिकार काँग्रेस नेत्यांना उरलेला नाही, असेही सनातनचे म्हणणे आहे. ज्या पक्षातील महासचिव आतंकवादी डॉ. झाकीर नाईकची गळाभेट घेऊन त्यांच्या व्यासपिठावर जातात, डॉ. झाकीरकडून ५० लाखांची मदत काँग्रेसला केली जाते. पंजाबमधील काँग्रेसी मंत्री नवज्योतसिंह सिद्धू भारतावर आक्रमण करणार्‍या पाकिस्तानी सैन्य प्रमुखांची गळाभेट घेतात. पाकिस्तानात जाऊन भारतातील शासन बदलण्याची लाचार आणि देशद्रोही मागणी करणार्‍या मणिशंकर अय्यरांची जी काँग्रेस घरवापसी करून घेते, अशांनी सनातनवर आरोप करू नये असे सनातन सूचवत आहेत.

- Advertisement -

भष्ट्राचारी नेत्यांना खडेबोल 

नुकतेच मणिपूर काँग्रेस आमदाराच्या घरी पोलीस मुख्यालयातून चोरीला गेलेली शस्त्रास्त्रे सापडली. बोफोर्सपासून आदर्श-खाण घोटाळ्यापर्यंत ज्या काँग्रेसचे मंत्री भ्रष्टाचारात आकंठ बुडाले आहेत (ही यादी न संपणारी आहे), अशा काँग्रेसी पापांसाठी काँग्रेसी प्रमुख राहुल गांधी किंवा तत्कालीन प्रमुख सोनिया गांधी यांना धरावे आणि त्यांना अटक करावी, अशी जर कोणी मागणी केली, तर ती जेवढी हास्यास्पद ठरेल, तेवढीच हास्यास्पद आणि बालीश मागणी महाराष्ट्रातील काँग्रेसी विनोदीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील करत आहेत, असे सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी म्हटले आहे.
दाभोलकर हत्येचा तपास चालू होण्याआधीच ज्या पृथ्वीराज चव्हाणांनी या हत्येमागे उजव्या विचारसरणीचा हात आहे, अशी आवई उठवून तपास भरकटवला. त्यांचेच भाऊबंद असलेले विखे-पाटील हेही स्वतःची पापं झाकण्यासाठी सनातनवर बंदीसाठी थयथयाट करत आहेत. त्यासाठी खोटे बोल पण रेटून बोल या काँग्रेसी तत्त्वानुसार सनातनवर खोटे आरोप करत आहेत. त्यामुळे सनातनवर बंदी येईल की नाही, हे काळ ठरवेल. पण विखे-पाटलांना तुरुंगाची हवा खाण्यासाठी सनातनचा सिंहाचा वाटा नक्की असेल, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असही त्यांनी पत्रकात नमूद केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -