घरमुंबईदाखला नसेल तरीही प्रवेश मिळणार! विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण निर्णय

दाखला नसेल तरीही प्रवेश मिळणार! विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण निर्णय

Subscribe

शाळेच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडे शाळा सोडल्याचा दाखला नसला तरीही विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा. विद्यार्थ्यांच्या जन्म प्रमाणपत्रवर शाळा प्रवेश देण्यात यावा, असा महत्वपूर्ण निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. विद्यार्थ्यांना एल.सी./टी.सी. अभावी प्रवेश नाकारु नये. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, याची मुख्याध्यापकांनी दक्षता घ्यावी. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिल्यास संबंधित मुख्याध्यापक आणि शाळाप्रमुख यांच्याविरुद्ध कायद्यातील तरतुदीनुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशाराही विभागाने दिला आहे.

प्रत्येक मुलाला शिक्षण घेण्याचा तसेच एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्याचा अधिकार आहे. सध्याच्या कोरोना काळात असामान्य परिस्थितीत आर्थिक कारणांमुळे शालेय शुल्क भरु न शकलेल्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी./एल.सी) काही शाळा नाकारत असल्याचे कळत आहे, असे शासन निर्णयात म्हटले आहे. शाळा सोडल्याचा दाखला नसल्याने विद्यार्थ्यांना इतर शासकीय आणि अनुदानित शाळेत प्रवेश नाकारला जात असल्याचे कळते. केवळ एल.सी./टी.सी. नसल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणे अन्यायकारक तसेच शिक्षणहक्क कायद्याची पायमल्ली करणारे असल्याचे विभागाने म्हटले आहे.

- Advertisement -

ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा एल.सी./टी.सी. उशिरा दिला जात असेल किंवा नाकारला असेल अशा विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देऊन तरतुदीनुसार पुढील कार्यवाही करावी. शिक्षण अधिकार कायद्यांतर्गत आठवीपर्यंत अशी तरतूद आहे. हा नियम आता नववी-दहावीच्या प्रवेशासाठी सुद्धा लागू केल्याचे निर्णयात नमूद केले आहे.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -