शिवसेना नेते एकनाथ शिंदे बंडखोरीमुळे राज्यात खळबळ सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्याला एकून 43 आमदार असल्याचा दावा केला आहे. यानंतर उद्धव ठाकरेंनी फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून शिवसैनिकांशी सवाद साधला आहे. यानंतर ट्विट करून चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
या ट्विटमध्ये त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या अडीच वर्षात सारखे सारखे हिदुत्व आणि शिवसेना वेगळे होऊ शकत नाही, असे सागावे लागते यातच तुमचा फोलपणा कळतो, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.
हिंदुत्व आणि शिवसेना वेगळं होऊ शकत नाही…
गेल्या अडीच वर्षात किती वेळा याचं सारखं सारखं स्पष्टीकरण द्यावं लागतं यातच तुमचा फोलपणा कळतो ना… @CMOMaharashtra जी pic.twitter.com/BU6ZL9a7nv— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 22, 2022
उद्धव ठाकरे काय म्हणाले –
उद्धव ठाकरे यांनी भावनिक शब्दांमध्ये आपली भूमिका मांडली. समोर बसा. मी आज माझ्या राजीनाम्याचे पत्र तयार ठेवतो आहे. हा कुठेही लाचारीचा प्रसंग नाही. मजबुरी तर अजिबात नाही. काय होईल जास्तीत जास्त? परत लढू. जोपर्यंत माझ्यासोबतच शिवसैनिक आहेत, तोपर्यंत मी कोणत्याही संकटाला भीत नाही. मी आज शिवसैनिकांनाही आवाहन करतोय. ही शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही, असे जे म्हणतात त्यालाही माझ्याकडे उत्तर आहे. जर शिवसेनेच्या कार्यकर्त्याला वाटत असेल की मी शिवसेना प्रमुख पद सांभाळायला नालायक आहे, तर मी शिवसेना प्रमुखपदही सोडेन. पण समोर येऊन सांगायला हवं. मी मुख्यमंत्रीपद आणि शिवसेना प्रमुखपद सोडेन. मी मुख्यमंत्रीपद सोडून पुन्हा शिवसेनेचाच मुख्यमंत्री होत असेल, तर मला आनंद आहे. पण एकदा मला समोर येऊन सांगा. समोर या, आणि सांगा, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.