घरताज्या घडामोडीचंद्रभागा तीरावरील घाटाची भिंत कोसळून ६ जण ठार

चंद्रभागा तीरावरील घाटाची भिंत कोसळून ६ जण ठार

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला असताना पंढरपुरात गुरुवारी दुपारी चंद्रभागा तीरावर असलेल्या कुंभार घाटाची भिंत कोसळली. त्यात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात दोन वारकरी महिलांचा समावेश आहे. बुधवार रात्रीपासून पंढरपुरात मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे कुंभार घाटाचे नव्याने केलेले बांधकाम कोसळून ही दुर्घटना घडली. अग्निशमन दल व आपत्कालीन यंत्रणेने हे सर्व सहा मृतदेह ढिगार्‍याखालून बाहेर काढले आहेत.

कुंभार घाटाजवळील या नवीन घाट सुशोभीकरणाच्या कामाच्या जवळच या लोकांनी छोट्या छोट्या झोपड्या होत्या. त्या ठिकाणी फूल विक्री, प्रसाद विक्री, नारळ विक्रीचा व्यवसाय केला जातो. आज दुपारी दीडच्या सुमारास मुसळधार पावसाने नवीन घाटाचे बांधकाम कोसळले व वीस फूट उंचीची भिंत या लोकांच्या अंगावर कोसळली. यामध्ये सहा जणांचे मृतदेह आतापर्यंत हाती लागले असून शोधकार्य अजूनही सुरू आहे. ढिगार्‍याखाली आणखी कुणी दबलं आहे का, याचा शोध घेण्यात येत आहे.

- Advertisement -

पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या काठावर नवीन घाट बांधून सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. जलसंपदा विभागाकडून हे घाट बांधणीचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. चुना वापरून दगडाचे बांधकाम केलेले आहे. मात्र, कुंभार घाटावर असणारे हे बांधकाम तिथेच राहणार्‍या काही लोकांच्या अंगावर कोसळले. यामध्ये आतापर्यंत सहा जणांचे मृतदेह मिळाले आहेत. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत माजी नगरसेवक रमेश कांबळे यांनी काही दिवसांपूर्वी उपोषण करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. या ठेकेदारावर गुन्हा दाखल न केल्यास मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका कोळी समाजाने घेतली आहे.

गोपाळ अभंगराव, राधा अभंगराव, मंगेश अभंगराव, पिलू जगताप अशी चार मृतांची नावे असून दोघांची ओळख पटलेली नाही. यात दोन यवतमाळ भागातील वारकरी महिलांचे मृतदेह असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -