देशात करोनाने शिरकाव केल्यानंतर केंद सरकारसह राज्य सरकारने करोनाशी दोन हात करायला सर्व यंत्रणा कार्यान्वित केली. दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकाने करोनाला राष्ट्रीय संकट घोषित करत करोनाची लागण होऊन मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा केली आहे.
By the way of a special one time dispensation, Government of India has decided to treat the #COVID19india outbreak as a notified disaster for the purpose of providing assistance under the State Disaster Response Fund (SDRF).@PMOIndia @HMOIndia @MoHFW_INDIA pic.twitter.com/4an1YdipiK
— Spokesperson, Ministry of Home Affairs (@PIBHomeAffairs) March 14, 2020
देशात ८२ जण करोनाग्रस्त असून करोनाने २ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने भारतात फोफावणाऱ्या करोनाला राष्ट्रीय संकट घोषित केले आहे. देशातील सर्व राज्यांमधील सरकारांना आता करोनाशी लढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद कोषातून (एसडीआरएफ) मदत मिळवू शकतात असे केंद्र सरकारने जाहिर केले आहे.