घरदेश-विदेशफैजाबादनंतर अहमदाबाद शहराचे नाव बदलणार

फैजाबादनंतर अहमदाबाद शहराचे नाव बदलणार

Subscribe

अहमदाबादचे लोकांना कर्णावती नाव खूप आवडते. योग्य वेळ आली की आम्ही नाव बदलणार आहोत. अहमदाबाद हे भारतातील एकमेव शहर आहे जिथे जागतिक वारसा आहे.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद जिल्ह्याचे नाव अयोध्या केल्यानंतर अवघ्या काही तासातच गुजरात सरकारने देखील अहमदाबाद शहराचे नाव कर्णावती करण्याची घोषणा केली आहे. जर लोकांचे समर्थन मिळाले आणि कायदेशीर प्रक्रियेत काही अडचणी आल्या नाही तर अहमदाबाद शहराचे नाव कर्णावती करण्याची तयारी आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी अहमदाबादचे नाव कर्णावती असे करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. गांधीनगर या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी अहमादाबादचे नाव बदलणार असल्याचे पत्रकारांना सांगितले. तसंच अहमदाबादच्या लोकांना कर्णावती नाव आवडत असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

जागतिक वारसा असलेले शहर

नितीन पटेल यांनी असे सांगितले की, गेल्या अनेक दिवसापासून अहमदाबाद शहराचे नाव बदलून कर्णावती केले जावे अशी मागणी केली जात होती. जर कायदेशीर प्रक्रियाला आम्हाला लोकांची मदत मिळाली तर आम्ही नाव बदलायला तयार आहोत. अहमदाबादचे लोकांना कर्णावती नाव खूप आवडते. योग्य वेळ आली की आम्ही नाव बदलणार आहोत. अहमदाबाद हे भारतातील एकमेव शहर आहे जिथे जागतिक वारसा आहे.

सुलतानाने बदलले होते नाव

अहमदाबादचे ११ व्या शतकातले नाव अशावल असे होते. अनिल्वराचा चालुक्य राजा कर्ण याने अशावलच्या भिल्ल राजाविरोधात लढाई जिंकली ज्यानंतर त्याने अशावलचे नाव बदलून कर्णावती असे ठेवले. त्याच नावाची आठवण म्हणून अहमदाबादचे नावही कर्णावती असे ठेवणार असल्याचे नितीन पटेल यांनी म्हटले आहे. कर्णावतीचे नाव अहमद शाह या सुलतानाने बदलून अहमदाबाद असे ठेवले होते. मात्र आम्ही हे नाव बदलण्याचा विचार करतो आहोत असेही नितीन पटेल यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

मतांसाठी भाजपकडून राजकारण सुरु

दरम्यान, भाजप सरकारच्या या वक्तव्यावर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. मतांचे राजकारण करायचे असल्याने भाजप अहमदाबद शरहाचे नाव बदलू इच्छित असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते मनिष दोशी यांनी केली आहे. अहमदाबाद शहराचे नाव कर्णावती करण्यात काहीही अर्थ नाही. हिंदूंची दिशाभूल करण्याचे काम भाजपाकडून होत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -