दमोहमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुनकुईया या गावात एका व्यक्तीने सासरा आणि मेव्हणीवर चाकूने सपासप वार केले. यात त्याची पत्नी देखील गंभीर जखमी झाली आहे. त्याच्या पत्नीची तब्येतही सध्या नाजूक आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही घटना पत्नी माहेरी निघून गेल्यामुळे झाली.
सनकुईया गावात राहणारी द्रौपदी अहिरवाल हीचे लग्न वर्षभरापूर्वी पन्ना जिल्ह्यातील सिमरिया या एका गावात झाले होते. लग्न झाल्यापासून घरात वाद विवाद होऊ लागले. दिवसेंदिवस हे वाद वाढत गेले. त्यानंतर द्रौपदीने आपल्या मामाकडे जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. द्रौपदीचा नवरा नवरा बुटिया अहिरवाल तीला अनेक वेळा घरी घेऊन आला. पण द्रौपदी पुन्हा माहेरी जाऊन राहिली. अखेर बुटीयाचा पारा चढला आणि त्याने टोकाचे पाऊल उचलले.
बुटीया मंगळवारी आपल्या बायकोला आणायला तिच्या माहेरी गेला. यावेळी त्याने रागाच्या भरात चाकून बायकोवर वार करायला सुरूवात केली. यावेळी तिचे वडिल आणि बहिण मध्ये पडली असता. त्याने त्या दोघांवर ही चाकूने वार केले. यात या दोघांचा मृत्यू झाला तर द्रौपदीची तब्येत गंभीर आहे. द्रौपदीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी बुटीयाला अटक केली आहे.
हे ही वाचा – असं काय घडलं; सुबोध भावे करतोय त्याचे ट्विटर अकाऊंट डिलीट