घरदेश-विदेशचीनच्या कुरापतीनंतर चीन लगतच्या सीमांवर हाय अलर्ट

चीनच्या कुरापतीनंतर चीन लगतच्या सीमांवर हाय अलर्ट

Subscribe

चीनच्या कुरापतीनंतर नौदल, भूदल आणि हवाई दल सतर्क

लडाखमध्ये भारत आणि चीन सैन्यात झालेल्या हिंसक चकमकीनंतर नौदल, भूदल आणि हवाई दल अधिकच सतर्क झाले आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, लष्कर संरक्षण प्रमुख (सीडीएस) जनरल बिपिन रावत आणि तीन सैन्य प्रमुख यांच्यात झालेल्या बैठकीत या तिन्ही सैन्यांना सतर्क राहण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतीय सैन्य ३५०० कि.मी. चीनच्या सीमेवर बारकाईने नजर ठेवत आहे. तिन्ही दलांना हाय अलर्ट करण्यात आलं आहे. चीनी नौदलाला उत्तर देण्यासाठी भारतीय नौदलही हिंद महासागरात सैन्य वाढवत आहे.

यासह लष्कराने अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेत (एलएसी) जवळील सर्व प्रमुख आघाडीच्या तळांवर अतिरिक्त जवान रवाना केले आहेत. वायुसेनेने आपल्या सर्व अग्रेषित तळांमधील एलएसी आणि सीमावर्ती भागांवर नजर ठेवण्यासाठी हाय अलर्ट करण्यात आलं आहे. पुढील कारवाईसाठी आता नियम वेगळे असतील. पंतप्रधानांनी या संदर्भात सविस्तर धोरण आखले आहे, अशी चर्चा आहे. भारत-चीन सीमेवरील १८० हून अधिक सीमा चौक्यांना सतर्क केलं आहे. नुकतीच आयटीबीपीने लडाखमधील सीमा चौकीवर १५०० अतिरिक्त जवान तैनात केले होते.

- Advertisement -

सोमवारी रात्री गॅलवान व्हॅलीमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये रक्तरंजित चकमक झाली. भारतीय सैनिकांची एक टीम चिनी सैनिकांशी बोलणी करण्यासाठी गेली होती, पण चिनी सैनिकांनी हल्ला केला. या चकमकीत भारतीय लष्कराचे २० सैनिक शहीद झाले, तर चिनी सैन्याच्या ३५ ते ४० सैनिक ठार झाल्याचं वृत्त एएनआय या वृत्त एजन्सीने दिलं आहे. तथापि, चीनने या हल्ल्याची योजना आधीच तयार केली होती. जेथे ते दगड, लोखंडी रॉड आणि नखे असलेली शस्त्रे घेऊन बसले होते. इतकेच नाही तर चिनी सैन्याने भारतीय सैन्याच्या पलटवार केला तर संरक्षण वस्तूदेखील सज्ज ठेवल्या होत्या. चीन ड्रोनच्या सहाय्याने भारतीय सैन्याच्या कारभारावर लक्ष ठेवून होता.


हेही वाचा – भारताची संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदी आठव्यांदा निवड

- Advertisement -

दरम्यान, गॅलवान व्हॅलीवरील तणावाबाबत बैठका सुरू आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी रात्री पंतप्रधान निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. लडाखच्या परिस्थितीवर चर्चा झाली. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ जून रोजी सर्वपक्षीय बैठक बोलविली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -