नवी दिल्ली – देशभारातल्या काँग्रेसमध्ये मोठे बदल होणार आहेत. काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी के. सी वेणूगोपाल यांनी महासचिव आणि प्रभारींना पत्र लिहिले आहे. देशभरात बूथ, ब्लॉक आणि जिल्हास्तरावर बदल केले जाणार आहेत. काँग्रेस समित्यांमध्ये पदाधिकारी निवडताना 50 टक्के पदे 50 वर्षा पेक्षा कमी वयाच्या लोकांना दिली जाणार आहेत. राज्यांमधील काँग्रेस प्रभारींनी 30 ऑगस्टपर्यंत यादी पाठवण्याच्या सूचना के. सी. वेणूगोपाल यांनी केल्या आहेत. राज्यांमधील काँग्रेस पक्ष आणि संघटना मजबूत करण्याच्या हेतून हे फेरबदल करण्यात येणार आहेत.
काँग्रेस पक्षाला मरगळ आल्याची टीका सतत्याने होत आहे. तळापर्यंत काँग्रेसचे कार्यक्रम आणि काँग्रेसची भूमिका त्यामुळे पोहोचत नाही. पक्षात जेष्ठांची संख्या अधिक आहेत. 50 वर्षांवरील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत. तरुणांची संख्या अपेक्षेनुसार नाही. यामुळे काँग्रेसची भूमिका प्रभावण्यासाठी वेणूगोपाल यांनी हे पत्र लिहिले आहे.