चारा घोटाळ्याप्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा झालेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव पटनावरुन रांचीला रवाना झाले आहे. उद्या सीबीआयच्या विशेष न्यायालयासमोर ते आत्मसमर्पण करण्यासाठी रांचीला रवाना झाले आहेत. रांचीला जाण्याआधी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका केली. देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत असल्याची टीका लालू प्रसाद यादव यांनी केली आहे.
Former Bihar Chief Minister Lalu Prasad Yadav on his way from Patna to Ranchi after Jharkhand High Court asked him to surrender by August 30. #FodderScam pic.twitter.com/ji05F0gvUW
— ANI (@ANI) August 29, 2018
देश हूकूमशाहीच्या वाटेवर
भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर नक्षलवादी संघटनांशी संबंधित असल्याच्या संशयारून पाच जणांविरोधात पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईवर लालू प्रसाद यादव यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. हा देश हुकूमशाहीच्या वाटेवर आहे. पाच विचारवंतांच्या अटक स्पष्ट करते की, ही आणीबाणीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे आणि मी त्याचा निषेध करतो.’ असे लालू प्रसाद यादव यांनी म्हटले आहे.
This country is moving towards dictatorship. The arrests of the five intellectuals show that the country is moving towards emergency and I condemn it: Former Bihar CM Lalu Prasad Yadav. #BhimaKoregaon pic.twitter.com/RB3jh6tRFw
— ANI (@ANI) August 29, 2018
न्यायव्यवस्थेवर पूर्ण भरोसा
लालू प्रसाद यादव यांच्या जामीनाची मुदत २० ऑगस्ट रोजीच संपली आहे. ही जामीनाची मुदत आणखी तीन महिने वाढवावी. अशी विनंती लालूप्रसाद यादव यांनी केली होती. मात्र न्यायालयानं ही विनंती फेटाळून लावली. उद्या म्हणजे ३० ऑगस्टला त्यांना न्यायालयासमोर आत्मसमर्पण करायचे आहे. त्यासाठी ते आज रांचीला रवाना झाले. रुग्णालयात आराम करण्याची हौस नाही. ‘न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण भरोसा असून आज नाही तर उद्या न्याय नक्की मिळेल’, असे लालू प्रसाद यादव यांनी म्हटले आहे.