घरदेश-विदेशकाँग्रेस समर्थकांमध्ये 'बिर्याणी' वरुन हाणामारी; ९ जणांना अटक

काँग्रेस समर्थकांमध्ये ‘बिर्याणी’ वरुन हाणामारी; ९ जणांना अटक

Subscribe

उत्तर प्रदेशमध्ये कॉंग्रेस समर्थक आपापसात भिडल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ९ जणांना अटक करण्यात आली असून ३४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

लोकसभा निवडणूकीची रणधूमाळी सर्वत्र पहायला मिळत आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात प्रचार-प्रसार करण्याची जय्यत तयारी करताना सर्वच राजकीय पक्ष दिसत असताना उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस समर्थक आपापसात भिडल्याची घटना घडली आहे. मात्र, हा समर्थकांमधील वाद उमेदवारीवरुन नाही तर बिर्याणीवरुन झाल्याचे समोर आले आहे. बिजनौर लोकसभा मतदारसंघात ही घटना घडल्याचे समोर आले आहे.

नेमके काय घडले?

राजकीय पक्षांचे नेते आणि उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवत आहेत. बिजनौर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी अशीच शक्कल लढवून प्रचारादरम्यान समर्थकांना बिर्याणी खाऊ घालण्याचा बेत आखला होता. त्यानुसार बिर्याणीही दिली. पण बिर्याणी खाण्यावरून त्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये बरेच समर्थत जखमी देखील झाले आहेत. याप्रकरणी ३४ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

- Advertisement -

बिर्याणी घेण्यावरून वाद

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ एप्रिल रोजी माजी आमदार मौलाना जमील यांच्या घरी प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. बिजनौर मतदारसंघातील काकरौली ठाण्याच्या हद्दीतील टडहेडा गावात ही सभा घेणयात आली. या प्रचार सभेनंतर दुपारी समर्थकांना जेवण ठेवण्यात आले होते. या जेवणामध्ये समर्थकांना बिर्याणी देण्यात आली होती. पण बिर्याणी घेण्यावरून उपस्थित समर्थकांमध्ये हाणामारी झाली. गावातील लोकांनी हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. प्रकरण शांत झाला मात्र, काहीवेळाने पुन्हा एकदा वाद चिघळला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटांनी काठ्यांनी एकमेकांना मारण्यास सुरुवात केली. बिर्याणी कमी पडल्यामुळे हा वाद सुरू झाल्याची माहिती काही गावकऱ्यांनी दिली आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल होत पोलिसांनी हस्तक्षेप करून समर्थकांना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि तेथील परिस्थिती नियंत्रणात आणली. विभागीय अधिकारी राम मोहन शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आचारसंहितेचं उल्लंघन आणि विविध कलमांखाली ३४ जणांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली असून गावात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


हेही वाचा – या चिमुरड्याच होतय कौतुक; त्यामागच कारणही तसच

- Advertisement -

हेही वाचा – मोदींच्या सभेपेक्षा बोरीवली स्टेशनला जास्त गर्दी; मोदींची सभा सोशल मीडियावर ट्रोल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -