घरदेश-विदेश'काश्मीर कालही भारतात होते, आजही आहे आणि उद्याही असणार'

‘काश्मीर कालही भारतात होते, आजही आहे आणि उद्याही असणार’

Subscribe

काश्मीरला सांभाळणं पाकिस्तानच्या अवाक्याबाहेर असल्याचे आफ्रिदी म्हणाला होता. त्याच्या या प्रतिक्रियेचे समर्थन केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे.

सध्या पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये त्याने काश्मीरच्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. या व्हिडिओमध्ये आफ्रिदी एका पत्रकार परिषदेत बोलताना दिसत आहे. त्यामध्ये त्याने कित्येक दिवसांपासून काश्मीरवर सुरु असणाऱ्या वादावर भाष्य केले आहे. त्याचबरोबर काश्मीरचा कारभार सांभाळण्याची पात्रता पाकिस्तानची नाही. शिवाय, ते पाकिस्तानच्या आवाक्याबाहेर असल्याचे आफ्रिदी म्हणाला आहे. आफ्रिदीच्या या प्रतिक्रियेचे देशाचे केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी समर्थन केले आहे. आज छत्तीसगडच्या एका सभेत ते बोलत होते. यावेळी काश्मीर कालही भारतात होते, आजही आहे आणि उद्याही असणारच असे सिंह म्हणाले.

हेही वाचा – काश्मीरला सांभाळणं पाकिस्तानला अशक्य – शाहीद आफ्रिदी

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले राजनाथ सिंह?

आफ्रिदीच्या पाकिस्तान संबंधी प्रतिक्रियेचे राजनाथ सिंह यांनी समर्थन केले आहे. ते म्हणाले की, आफ्रिदी बरोबर बोलला आहे. पाकिस्तान खरच कारश्मीरला सांभाळू शकत नाही. ते त्यांच्या अवक्याबाहेरच आहे. मग काश्मीर काय सांभाळणा? असा सवाल त्यांनी केला आहे. त्याचबरोबर काश्मीर कालही भारतात होते, आजही आहे आणि उद्याही असणार, असेही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा – पाकिस्ताननं भारतीय हद्दीत घुसवलं हेलिकॉप्टर! पाहा व्हिडिओ

- Advertisement -

आफ्रिदी काय म्हणाला?

आफ्रिदी म्हणाला की, ‘काश्मीरला सांभाळणं पाकिस्तानच्या अवाक्याबाहेर आहे. पाकिस्तानकडून देशातील नागरिकांचाच सांभाळ होत नाही. मग पाकिस्तान काश्मीरला कसे सांभाळू शकेल?’. यापुढे तो म्हणतो की, काश्मीर कुणालाच देऊ नका. न भारताला काश्मीर देऊ आणि न पाकिस्तानला. शिवाय, पाकिस्तान स्वत:च्या देशातील नागरीकांचा सांभाळ करु शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार? त्यामुळे काश्मीरला इशू नका बनवू. काश्मीरला विभक्त असा देश बनवा. जेणेकरुन तिथले नागरिक सुखाने राहू शकतील, मग ते कुठल्याही धर्माचे असूदेत. काश्मीरमध्ये माणूसकी जिवंत राहणे फार गरजेचे आहे, असेही आफ्रिदी म्हणाला. याअगोदरही आफ्रिदीने काश्मीरवर टिपण्णी दिली आहे.


हेही वाचा –  पुन्हा पाकिस्तानात भारतीय चित्रपट, मालिकांवर बंदी!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -